

Jharkhand Scheme: Savitribai Phule Kishori Samriddhi gives up to ₹40,000 to schoolgirls to curb child marriage
esakal
मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये आणि बालविवाहाला आळा बसावा, यासाठी झारखंड सरकारची 'सावित्रीबाई फुले किशोरी समृद्धी योजना' महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ८वीपासून १२वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते. तसेच १८ ते १९ वर्षे वयाच्या अविवाहित मुलींना एकरकमी २० हजार रुपये देण्यात येतात. पात्र मुलींना संपूर्ण योजनेअंतर्गत एकूण ४० हजार रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळू शकतो.