
दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी
मुंबई : सरकारी नोकऱ्यांच्या शोधात असलेल्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेमध्ये भरपूर रिक्त जागा आहेत. रेल्वे हजारो पदांसाठी भरती करत आहे. पश्चिम रेल्वे ३ हजार ६१२ शिकाऊ पदांसाठी भरती करत आहे.
रेल्वेमध्ये ३ हजारहून अधिक पदे भरायची आहेत. पश्चिम रेल्वेच्या भरतीतून एकूण ३ हजार ६१२ पदे भरायची आहेत. ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून आहे.
या रिक्त पदाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती १०वी पास आणि ITI उमेदवारांसाठी आहे. ज्यांनी १०वी नंतर शिक्षण घेतले नाही ते यासाठी अर्ज करून नोकरी मिळवू शकतात. लक्षात ठेवा तुमच्याकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
प्रत्येक भरतीसाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा आहे. त्याचप्रमाणे शिकाऊ उमेदवाराच्या भरतीसाठी नेहमी किमान १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असते. २४ वर्षांवरील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
१०वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. विशेष म्हणजे उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. मेरिटमध्ये आलेल्या उमेदवारांना थेट नोकरी मिळेल.
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांना नाव, पत्ता, ईमेल, शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागतील.