Sakal Impact : महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

eleventh admission
eleventh admissionsakal media

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीचा विसर पडलेले शालेय शिक्षण विभाग 'सकाळ' ने दिलेल्या वृत्तानंतर (sakal news) ताळ्यावर आहे. त्यामुळे जयंतीच्या दिनी ठेवण्यात आलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (eleventh online admission) ही शुक्रवारी, 1 ऑक्टोबर रात्री उशिरा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले. यामुळे आता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी होणारी तिसऱ्या टप्प्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ही आता 4 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

eleventh admission
मुंबईत 72 हजारांहून अधिक होम आयसोलेशन रुग्ण

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मुख्य तीन प्रवेश फेऱ्या आणि त्यानंतर एक विशेष फेरी आयोजित करून शालेय शिक्षण विभागाने एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारासमोर लोटांगण घेत शिक्षण विभागाने प्रथम येणाऱ्यास प्रथम (एफसीएफएस) प्रवेश टप्प्यासाठी तब्बल सात प्रवेश टप्प्याचे आयोजन केले होते. काही मूठभर संस्थांना बेकायदेशीर प्रवेशाचा लाभ व्हावा म्हणून हा सर्व प्रकार करण्यात असल्याचा आरोपही केला जात आहे.

तर यावर अनेक संघटनांनी आक्षेपही नोंदवले आहेत. मात्र यात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा शिक्षण विभागाला विसर पडल्याने त्यासाठी, 27 सप्टेंबर रोजी सकाळने 'शिक्षण विभागाचा गलथान कारभार; गांधी जयंतीच्या दिवशीही ठेवली अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर तातडीने कार्यवाही करून प्रवेश प्रक्रियेत बदल केले जातील, असे आश्वासन शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप दिले होते मात्र त्यासाठी पुन्हा एकदा खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याविषयी जाणीवपूर्वक दिरंगाई करत 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी आयोजित केलेली प्रवेश प्रक्रिया ही पुढे ढकलण्याची माहिती विभागाकडे उशिराने सादर केली असल्याचे विभागातील अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

तर विषयी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास दिरंगाई का करण्यात आली याविषयी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. तर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी येणारे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलावे अशी मागणी करणाऱ्या एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख यांनी याविषयी आपण आता काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com