- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
एखाद्या गोष्टींमध्ये आपल्याला पारंगत होण्यासाठी आयुष्यातले दहा हजार तास त्यासाठी समर्पित करावे लागतात. आता हे दहा हजार तास आपण केव्हा सुरू करायचे?
पुढच्या आयुष्यात नेमकं कोणतं करिअर निवडायचं याचा निर्णय काही जण शालेय आयुष्यातच घेतात. आणि पूर्णपणे त्या विषयाला वाहून घेतात. सर्वांगीण विकास हे ध्येय ठरवून औपचारिक शिक्षणातून अनेक गोष्टी शालेय वयातच विद्यार्थ्यांना शिकवण्याचा घाट घातला जातो. जेणेकरून ते सर्व गुणसंपन्न व्हावे, असा ‘होलिस्टिक’ दृष्टिकोन शिक्षणाच्या बाबतीत ठेवलेला असतो.