NAAC
NAACSakal

संख्येच्या नाही तर गुणवत्तेच्या आधारावर नॅक मूल्यांकन - डॉ. भूषण पटवर्धन

नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद - संकल्पना व पद्धती’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
Summary

नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद - संकल्पना व पद्धती’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे - देशातील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी निश्चित करणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (नॅक) मूल्यमापन प्रक्रियेत आमूलाग्र बदल होणार असून, पुढील काळात हे मूल्यांकन संख्येच्या नाही तर गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. ही बदलाची प्रक्रिया नॅकने सुरू केली असून सर्वांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील नॅककडून करण्यात आले आहे.

नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद - संकल्पना व पद्धती’ या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अंतर्गत गुणवत्ता कक्ष आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्विस यांच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादात आयसरचे माजी प्राध्यापक डॉ. के. पी. मोहनन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. आर. एस. माळी, कर्वे इन्स्टिट्यूटचे मधुकर पाठक, संदीप खर्डेकर, धनंजय कुलकर्णी, एम. शिवकुमार, विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाच्या संचालिका डॉ. सुप्रिया पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. पटवर्धन म्हणाले, 'तुमच्या ग्रंथालयात किती पुस्तके आहेत, तुमच्याकडे किती ठिकाणी वायफाय सुविधा आहे असे प्रश्न आता मुल्यांकन प्रक्रियेत असणार नाहीत. या बदलात आम्ही सर्वांना सामावून घेत आहोत. आतापर्यंत ४७ वेळा मसुद्यात बदल करून आम्ही पुन्हा नव्या सूचनांसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने हे बदल होत असून यामध्ये शिक्षणाच्या मूळ उद्देशाच्या अनुषंगाने मुल्यांकन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

शिक्षण हे मूल्यांवर आधारित असायला हवे हे आपल्या गुरू शिष्य परंपरेत सांगितले आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मूलभूत शिक्षणावर भाष्य केले आहे, त्याचा अभ्यास करत शिक्षकांनी आपल्या पातळीवर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी.

- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू

शिक्षकांनी पुस्तकातील शिक्षणाचा संदर्भ जगण्याशी जोडत आपली शिकवण्याची पद्धत निर्माण करावी. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अनुभव आधारित व रोजच्या जगण्याशी निगडित असावे, हेच शैक्षणिक धोरण २०२० मध्येही सांगितले आहे.

- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com