Personality Development
sakal
स्वातंत्र्योत्तर काळात देशात शिक्षणविषयक विचार करण्यासाठी अनेक आयोगांनी कार्य केले; तथापि त्याचा अपेक्षित परिणाम म्हणून जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढली असे ठोसपणे जाणवत नाही. विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे आणि विविध शिक्षणसंस्थांमध्ये दिले जाणारे औपचारिक शिक्षण आज व्यक्ती, समाज अथवा देशातील मूलभूत प्रश्नांचे निराकरण करण्यास पुरेसे प्रभावी ठरत नाही; तर काही वेळा ते नव्या समस्यांनाही जन्म देत असल्याचा अनुभव येतो. थोडक्यात शिक्षणाचा आज घेतला जात असलेला अर्थ अपुरा वाटतो.