पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुली (ओपन टू ऑल) फेरी सोमवारी संपली. या फेरीत एकूण तीन लाख २४ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत..आता अकरावी प्रवेशाची विशेष फेरी मंगळवारपासून ( ता. १२) सुरू होणार आहे. विशेष फेरीत मंगळवार (ता. १२) आणि बुधवारपर्यंत (ता. १३) नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी आणि भाग एकमध्ये दुरुस्ती करता येणार आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी खुल्या फेरीत 'कॅप 'अंतर्गत तीन लाख १९ हजार ५८२ इतक्या, तर कोट्यामध्ये (व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा) पाच हजार १७९ इतक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आता अकरावीच्या प्रवेशासाठी विशेष फेरी राबविण्यात येणार असून आहे..अशी असेल विशेष फेरी :तपशील : कालावधी- नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जांचा भाग एक दुरुस्ती करणे, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन, अल्पसंख्याक) कोटातील जागा प्रत्यार्पित करणे : १२ ते १३ ऑगस्ट- विशेष फेरीसाठी पोर्टलवर रिक्त जागा प्रदर्शित करणे : १४ ऑगस्ट.- विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे, राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आणि प्रवेश अर्ज भाग दोनमध्ये प्राधान्यक्रम नोंदविणे : १५ ते १७ ऑगस्ट- विशेष फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट याद्या जाहीर करणे : १९ ऑगस्ट (सकाळी ११ वाजता )- विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत : १९ ते २० ऑगस्ट.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.