अनेकदा अपेक्षित गुण व रँक न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शासकीय किंवा आवडत्या महाविद्यालयातील हवे ते कोर्स मिळत नाही किंवा बोर्डात किमान पात्रता गुण न मिळाल्याने प्रवेश मिळत नाही.
बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते नीट, जेईई, एमएचटी-सीईटी, एनडीए, एनआयएफटी, एनआयडी इ. यांसारख्या स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे.