
भारतीय संस्कृतीमध्ये चार युगांची संकल्पना मांडली आहे. त्यांपैकी द्वापारयुगाच्या अंती आणि कलियुगाच्या आरंभाआधी काही काळ भारताच्या सामाजिक आणि राजकीय पटलाव र जी स्थित्यंतरे घडली, त्याचे यथार्थ वर्णन महाभारतात आलेले आहे. मात्र, महाभारत म्हणजे केवळ कथांचा किंवा तत्कालीन घटनाक्रमांचा संग्रह नसून त्यातून शाश्वत नीतिमूल्यांच्या कालानुरूप आचरणाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.