बदाम खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर समजले जाते. पण जर तुम्ही कच्चा बदाम जास्त प्रमाणात खाणार असाल तर त्यामुळे आरोग्याला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे मूत्रपिंड, यकृत तसेच शरीराच्या इतर अवयवांमध्ये (Body Parts) समस्या निर्माण होतात, असे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पण कच्चा बादाम योग्य प्रमाणात खाल्लात तर तो फायदेशीर आहे, परंतु जर जास्त प्रमाणात खाल्लात तर तो शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे अशा प्रकारे बदाम खाल्ल्याने शरीरावर होणारे तीन परिणाम समजून घेणे गरजेचे आहे. (Kachcha Badam Effect On Body)
या होतील समस्या
१) यकृतावर परीणाम- कच्चा बदाम खाल्ल्याने यकृतावर परिणाम होऊ शकतो. यामुळे शरीरात मायकोटॉक्सिनचे लक्षण खूप वाढते. यामुळे पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होतात. तसेच फोट फुगू शकते. काही वेळा बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते.
२) मायग्रेनचा त्रास- मायग्रेनचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी कच्चा बदाम खाणे योग्य नसते. बदामात अनेक प्रकारची संयुगे असतात, ज्यामुळे शरीरात अनेक रासायनिक क्रिया होतात परिणामी मायग्रेनच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो.
३) किडनीवर परिणाम- कच्च्या बदामात ऑक्सलेट असते. किडनी स्टोन होण्याचे ते एक कारण आहे. तसेच बदाम मूत्रपिंडासाठी हानिकारक मानला जातो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.