काश्मीरप्रश्नी इतर देशांनी भारतावर दबाव टाकावा : परराष्ट्रमंत्री

काश्मीरप्रश्नी इतर देशांनी भारतावर दबाव टाकावा : परराष्ट्रमंत्री

इस्लामाबाद : काश्मीर प्रश्नी भारतावर दबाव टाकण्यासाठी इतर देशाने हस्तक्षेप करावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. इतर देशाने हस्तक्षेप केला तर ती चांगली बाब असेल, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले. तसेच आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही पण भारताने चर्चा करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली नाही, असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आले. त्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर आता परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यात आम्हाला अडचण नाही. त्यासाठीच्या प्रस्तावाचा आम्ही कधीही विरोध केलेला नाही. 

दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारताबरोबर चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही, असे म्हटले होते. तसेच आता पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्याने पाकिस्तानची भूमिका बदलल्याचे दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com