पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, 'आता भारताशी चर्चा नाही'

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, 'आता भारताशी चर्चा नाही'

इस्लामाबाद : आता कोणत्याही मुद्द्यावर भारतासोबत चर्चा शक्य नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. तसेच दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे जर युद्ध झाले तर धोका वाढत जाईल, असेही ते म्हणाले. 

भारताने जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भडकावू वक्तव्य केली जात आहेत. तसेच त्यांच्याकडून युद्धाची भाषाही केली गेली. त्यानंतर अमेरिकेतील 'न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

इम्रान खान म्हणाले, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यात लढाई झाली तर धोका वाढत जाईल. भारताशी चर्चा करण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला. मात्र, भारताला आणि त्यांच्या पंतप्रधानांना अशा प्रकारचा कोणतीही चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही, असे मला वाटते. त्यामुळे आता भारताशी चर्चा होणार नाही हे स्पष्ट आहे. 

दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न 

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र, शांतता आणि चर्चेसाठी मी करत असलेले प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत, असे मला समजत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com