'मदरश्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देतंय'

१९५६ नंतर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धार्मिक संतुलन बिघडवण्यास सुरूवात केली.
india_pakistan.jpg
india_pakistan.jpgSakal

मदरश्यांच्या माध्यमातून पाकिस्तान भारतातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. तिथे साधारण ४० हजार मदरसे आहेत, जिथून दरवर्षी मोठ्या संख्येने आतंकवादी तयार होतात. फक्त एवढंच नव्हे तर पाकिस्तानची काश्मीर निती अजूनही सैन्याच्याच नियंत्रणाखाली आहे आणि हेच कारण आहे की, पाकिस्तानातली कोणतीही तज्ज्ञ व्यक्ती दहशतवाद संपवण्याविषयी बोलत नाहीये, असा दावा अमेरिकी थिंकटँकच्या बाल्टिमोर पोस्ट एक्झामिनरने आपल्या नव्या अहवालामध्ये केला आहे.

या अहवालात असंही म्हटलं आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीख यांचं विधान हे सैन्याला खूश करण्यासाठी पाठ करून केलेलं विधान आहे. शरीफ म्हणाले होते की आम्हाला भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. पण शांतता ही काश्मीर वादावर तोडगा निघाल्याशिवाय शक्य नाही.

अहवालानुसार, पाकिस्तान हा कृषीप्रधान देश आहे, ज्याच्या पश्चिमी भागात लागणारं दोन तृतीयांश पाणी काश्मीरच्या नद्यांमधून येतं. पण त्यांनी कायद्यांचं पालन करण्याऐजी काश्मीरचा ताबा घेण्याची नीती अवलंबली आहे. या अहवालानुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पाकिस्ताला गिलगिट आणि इतर दोन भागांमधून माघार घेण्यास सांगितलं होतं. पण पाकिस्तानने याबाबतीत काहीही ऐकलं नाही. त्यानंतर १९५६ नंतर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धार्मिक संतुलन बिघडवण्यास सुरूवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com