Water benefit for mental health: आपल्या शरीरामध्ये ६० टक्के भागामध्ये पाणी आहे. त्यामुळे आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला जाणवू शकते. आता एक संशोधनामधून समोर आले आहे की पाणी पिण्यामुळे तुमचा ताण नष्ट होतो त्यासाठी रोज केवळ ५ ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यायले पाहिजे. असे संशोधातून समोर आले आहे. (A glass of water can help with anxiety and calm you down)
ऑस्ट्रेलियाच्या फेडरल हेस्थ ऑथॉरिटीने एक रिसर्ट ट्व्टिट केला आहे. या रिसर्चमधून समोर आले आहे की, मेंदूमध्ये पाण्याची कमतरतेमुळे चिंता, तणाव, नैराश्य इ. मानसिक समस्या वाढतात. तसेच संशोधनमध्ये असे सांगितले आहे. रो ५ ग्साल पाणी किंवा त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने, तणाव आणि डिप्रेशनचा धोका कमी होतो आणि तुम्ही जास्त आनंदी राहता.
आपल्या मेंदूच्या सुमारे ७५% ऊती पाण्याने बनलेल्या असतात. या कारणास्तव, मेंदूला ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि मेंदूची रचना व्यवस्थित ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. डिहायड्रेशनमुळे मेंदूतील पेशी नीट काम करत नाहीत आणि कोणतेही काम करणे कठीण होते. डिहाइड्रेशनचा मूडवरही परिणाम होतो आणि त्यामुळे राग, निराशावादी वर्तन होऊ शकते. कारण डिहाइड्रेशनमुळे हैप्पी हॉर्मोन सेरोटोनिन तयार करणाऱ्या रसायनाची मदत मिळणे कठीण होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.