

Health
Sakal
डॉ. मालविका तांबे
मध्यंतरी एका परिचितांच्या घरी चर्चा चालू होती की अगदी जवळच्या नातेवाइकांना आमंत्रण व्यवस्थित न दिल्यामुळे ते रुसून बसलेत आणि यायला तयार नाही. तेव्हा तिथली एक व्यक्ती मला म्हणे, ‘‘अहो डॉक्टर, एक आजारच असतो की जो आमंत्रणाशिवाय सुद्धा घरात येतो.’’ त्यांचं हे वाक्य ऐकून मला आश्चर्यच वाटलं. मी त्यांना म्हटलं की आयुष्यात कुठलीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. रोगाला आमंत्रण देणारे आपणच असतो आयुर्वेदात कार्य व कारण हा सिद्धांत निदानाकरता अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. कारणाला आयुर्वेदामध्ये निदान असे सुद्धा म्हटले जाते. आयुर्वेदानुसार कुठलीही गोष्ट किंवा आजार हे कारणाशिवाय घडू शकत नाही. आजाराचे मूळ कारण शोधून काढल्याशिवाय त्याच्यावरती उपचार सापडत नाहीत.