Holi
sakal
शिशिर ऋतू संपत आला की येणाऱ्या वसंताची तयारी करावी लागते. साधारणतः होळी हा थंडीला दिलेला शेवटचा चटका, आयुर्वेदात जो एक सौनासारखा प्रकार सांगितला आहे. हा प्रकार समजावा यासाठी त्याला गोष्टीची जोड देऊन त्याचे उत्सवात रूपांतर करून, त्याला कर्माची जोड देऊन होळीचा उत्सव सांगितलेला असतो.
छातीत कफ झाला तर छातीवर निखारे ठेवता येत नाहीत, त्यासाठी तेल लावून तेल लावलेल्या रुईच्या पानांनी छाती शेकावी किंवा मीठ व ओव्याची पुरचुंडी तव्यावर गरम करून शेकावी. थोडक्यात काय, तर छातीतील कफ वितळण्यासाठी अग्नी मदतरूप ठरतो. परंतु अग्नीचा उपयोग करून घेण्यासाठी एक व्यवस्था लागते.