

- डॉ. मालविका तांबे
सर्दी हा एक सामान्य रोग धरला जातो, त्यामुळे सर्दी झाली की तिचा फारसा विचार केला जात नाही. सर्दी झाली तरीही लोक समाजात काहीही काळजी न घेता वावरत राहतात. कोविडसारख्या प्रसंगानंतर समाजात याबद्दल जागरूकता वाढेल असे वाटले होते पण कुत्र्याची शेपूट वळत नाही त्याप्रमाणे कोविड गेल्या गेल्या लोक सर्दी झाली तर काय काळजी घ्यावी हे संपूर्णतः विसरून गेलेले आहेत.