

शहरात राहिल्याने आर्थिक प्रगती होते, पुढे जाण्याची संधी मिळते हे खरे असले तरीही इथे लक्षावधी भारतीय ज्या हवेत श्वास घेतात ती हवा धोकादायकरित्या प्रदूषित आहे. भारतात हवेचा दर्जा खालावलेला आहे, इथल्या प्रमुख शहरांमध्ये तो “अनारोग्यकारक” आणि “अतिअनारोग्यकारक” पातळीवर पोहोचलेला आहे, जिथे हवेत PM2.5 चे प्रमाण खूप जास्त आहे ज्यामुळे नागरिकांसाठी, विशेषत: लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तांसाठी आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होत आहेत.