

The Gap in Human Well-being: Why Technology Alone Isn't Enough
Sakal
सद्गुरू, ईशा फाउंडेशन
सद्गुरू : हजारो वर्षांच्या सभ्यतेनंतर, हजारो वर्षे इतर अनेक प्राण्यांच्या प्रजातींची आणि कधी कधी आपल्याच वंशाची कत्तल केल्यानंतरदेखील, मानवी कल्याण अजूनही दूर आहे. सर्व प्रकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बाह्य परिस्थितीमध्ये इतके बदल केले आहेत, तरीही आपण दहा हजार वर्षांपूर्वीच्या तुलनेत मानवी कल्याणाच्या जवळपाससुद्धा पोहोचलेलो नाही. त्यामुळे, निश्चितच आता आपण अंतर्मुख होऊन मानवी कल्याण कसे निर्माण करायचे, हे पाहण्याची वेळ आली आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातून तुम्ही हे स्पष्टपणे पाहू शकता, की खरे कल्याण तुम्हाला तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा तुमच्या आंतरिकतेमध्ये बदल होईल.