

Can Ayurveda Help Manage Parkinson’s Disease? Research Reveals Key Findings
sakal
वाढत्या वयात हात थरथरणे, चालताना तोल जाणं किंवा हालचाली मंदावणं याकडे अनेकजण साधी समस्या म्हणून पाहतात. पण ही लक्षणं पार्किन्सन्स या गंभीर मेंदूच्या आजाराची सुरुवात असू शकतात. मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन कमी झाल्यामुळे हा आजार होतो आणि त्याचा परिणाम हळूहळू शरीराच्या हालचालींवर दिसू लागतो. सध्या पार्किन्सन्सवर पूर्ण इलाज नाही. मात्र, आयुर्वेद या आजारात काही प्रमाणात मदत करू शकतो का, यावर संशोधन सुरू आहे. काही अभ्यासांमध्ये आयुर्वेदिक घटकांमुळे मज्जातंतूंना संरक्षण मिळून हालचाली सुधारण्यासाठी मदत झाल्याचं दिसून आलं आहे. याबाबत संशोधन नेमकं काय सांगतं, ते सविस्तर जाणून घेऊया.