गुरुकुल पद्धतीने शिक्षण हे भारताचे वैशिष्ट्य होय. पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्य व विद्याभ्यासाचा संस्कार झाला की शिष्य गुरूंच्या आश्रमामध्ये राहायला जात असे आणि शास्त्राध्ययन करत असे. गुरू व अध्ययनासाठी आलेले विद्यार्थी हे सर्व एकत्र कुटुंबाप्रमाणे राहत असत, म्हणून ‘गुरू-कुल’ हा शब्द आला असावा.