

Travel of Body vs. Journey of Soul: Understanding Sant Namdeo’s Abhang
Sakal
काय करूनी तीर्थाटणे ।
मन भरीले अवगुणे ॥१॥
काय करावे ते तप ।
चित्ती नाही अनुताप ॥ २॥
मन:संकल्पाची पापे ।
न जाती तीर्थाचेनि बापे ॥३॥
नामा म्हणे सोपे ।
पाप जाय अनुतापे ॥४॥
संत नामदेव महाराज
तीर्थाटन ही भारतीय अध्यात्म परंपरेतील पवित्र संकल्पना आहे. परंतु नामदेव महाराज पहिल्याच चरणात प्रश्न विचारतात, की मन अवगुणांनी भरलेले असेल, तर तीर्थयात्रेचा उपयोग काय? आपण आज अनेकदा धार्मिक पर्यटन करतो, देवदर्शन करतो, पवित्र स्नान करतो; परंतु परतल्यानंतर आपल्या स्वभावात काय बदल होतो, हा प्रश्न मात्र विचारत नाही. राग, मत्सर, दोषदृष्टी, अहंकार, स्पर्धा आणि कटुता हे सर्व जसेच्या तसे मनात राहतात. अशा वेळी तीर्थाटन हा शरीराचा प्रवास ठरतो; मनाचा नाही. धर्माचा अनुभव पर्यटनात बदलतो, परंतु परिवर्तनात बदलत नाही. मळकं मन घेऊन केलेल्या धार्मिक कृती हे अवडंबर आहे. अवगुण सोडून सद्गुणांकडे केलेला प्रवास ही खरी तीर्थयात्रा आहे.