
- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
ग्रामीण भागांत किंवा अनेक शहरी भागांमध्येही आजारपणाबाबत मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आढळतात. वेळ गेल्यावर डॉक्टरांकडे नेले जाते. आजारपणाकडे अंधश्रद्धेच्या आणि चुकीच्या समजुतींच्या चष्म्यातून पाहिलं जातं. कोणाला थोडा थकवा, दुखणं, गाठी वगैरे जाणवलं, की लोक लगेच म्हणतात, ‘अंगात आलंय’, ‘नजर लागलीये’, किंवा ‘बाहेरचं काही आहे’ अशा प्रकारचे समज अजूनही आहेत.