जीवनप्रवासाच्या येरझाऱ्या

दैनंदिन प्रवासाच्या ताणातून मुलांचे व मोठ्यांचे शारीरिक‑मानसिक आरोग्य धोक्यात; शाळा, नोकरी आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींवर संतुलित आयुर्वेदीय दृष्टिकोनातून चिंतन
Wellness Life 

Wellness Life 

Sakal

Updated on

‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ वगैरे प्रवासाचे फायदे वर्णन करणारे श्‍लोक आपल्याला माहीत असले तरी प्रवास हा माणसाला स्वतःच्या घरापासून दूर नेतो व त्यामुळे प्रवास एकदा केला की परतीचा प्रवास करावाच लागतो, कारण माणसाला स्वतःच्या घरी परत यायचे असते. मनुष्य स्वतःपासून जेवढा दूर पळतो, तेवढा तो अस्वस्थ होतो, त्याचे मन अशांत होते व त्याचा मानसिक ताण वाढतो, त्याला शारीरिक थकवा येतो आणि त्याला आपण केव्हा एकदा परत जातो याची ओढ लागते, म्हणजेच त्याचे लक्ष घराकडे लागते. जे कार्य करत आहे, त्याकडे लक्ष न लागता लक्ष दुसरीकडे असले तर कामाचा आनंद घेता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com