

Wellness Life
Sakal
‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ वगैरे प्रवासाचे फायदे वर्णन करणारे श्लोक आपल्याला माहीत असले तरी प्रवास हा माणसाला स्वतःच्या घरापासून दूर नेतो व त्यामुळे प्रवास एकदा केला की परतीचा प्रवास करावाच लागतो, कारण माणसाला स्वतःच्या घरी परत यायचे असते. मनुष्य स्वतःपासून जेवढा दूर पळतो, तेवढा तो अस्वस्थ होतो, त्याचे मन अशांत होते व त्याचा मानसिक ताण वाढतो, त्याला शारीरिक थकवा येतो आणि त्याला आपण केव्हा एकदा परत जातो याची ओढ लागते, म्हणजेच त्याचे लक्ष घराकडे लागते. जे कार्य करत आहे, त्याकडे लक्ष न लागता लक्ष दुसरीकडे असले तर कामाचा आनंद घेता येत नाही.