
सद्गुरू
प्रश्न : तमीळमध्ये एक म्हण आहे जिचा अर्थ, ‘खरे बोलून कोणीही स्वतःचा नाश करून घेतला नाही. खोटे बोलून कोणीही चांगले जगू शकला नाही.’ हे खरे आहे का?
सद्गुरू : प्रथम, आपण सत्य आणि असत्य याची व्याख्या करणे आवश्यक आहे. आपण केवळ वस्तुस्थिती सांगण्याच्या संदर्भात शाब्दिक सत्याबद्दल बोलत आहोत, की जीवनपोषक या अर्थाने सत्याबद्दल बोलत आहोत? निश्चितच सत्य जीवनाला पोषण देते. खोटे जीवनाला खाली खेचते. त्या संदर्भात, ही म्हण १०० टक्के खरी आहे; पण जर तुम्ही याकडे शाब्दिक सत्य आणि शाब्दिक असत्य म्हणून पाहिले, तर - वस्तुस्थिती सांगणे हे सर्वकाही नाही. सत्य म्हणजे आत्ता जे आहे त्याचा वास्तविक संदर्भ आणि अर्थ पाहणे. सत्य व्यक्त करून, निश्चितच कोणीही हरवणार नाही. सतत खोटे बोलून, कोणीही समृद्ध होणार नाही.