Health: वात वाढवणारा आहार कोणता ? जेवणात टाळा ही पदार्थ

वय वाढतं तसा आहार कमी होतो विहार मंदावतो आणि वात दोषाची विकृती वाढते.
Health
Health Esakal

प्रत्येक माणूस तीन काळातून जातो अन् प्रत्येक काळाशी त्याच्या आरोग्याचा संबंध दडलेला असतो. बालपण, तारूण्य आणि वृद्धत्व हे तीन काळ एकेका दोषाने प्रभावीत झालेले दिसतात. बालपण कफाने, तारूण्य पित्ताने तर वृद्धत्व वात दोषाने प्रभाव‌ति झालेले असते. आज आपण ज्येष्ठांमधील आजार हा विषय पाहत असल्याने ज्येष्ठत्वातील वाताच्या विकृत प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी आयुर्वेदाच्या अंगाने उपचार पाहणार आहोत.

कोणत्या आहार आणि विहाराने वाताच्या दोषाची वाढ नियंत्रणात आणता येते याचा विचार करताना कोणती आहार व विहारपद्धती या दोषांना वाढवते हे अभ्यासणं आवश्यक ठरतं. आहाराचा प्रत्येक कण शरीर आणि मनोषक असतो. तसा तो शरीर आणि मनोघातक ही प्रकृती काळाप्रमाणे ठरताना दिसते. म्हणूनच आयुर्वेद ग्रंथकारांनी दिनचर्या आणि ऋतूचर्या यांचं पालन करायला सांगितलं आहे. या ही पुढे जाऊन वयोमानाप्रमाणे शरीरात दोषांची साठवण होण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने वयाच्या अनुषंगाने आहार पद्धती योजणं आवश्यक ठरतं. वाताचा परिणाम असला तरी शरीराने अगोदरच्या काळात घेतलेल्या काळजीचा थेट संबंध येथे येतो.

अगोदर प्रस्तूत जशी काळजी घेतल्यास पुढील ऋतूचा त्रास उद्भवत नाही तसंच बालपण, तारूण्य या अवस्थांमध्ये उत्तम नियोन केल्यास वृद्धापकाळात अधिक त्रास होत नाही. त्याची अनेक उदाहरणं दिसून येतात आणि ही सर्व मागील पिढीमध्ये दिसतात हे विशेष. त्याचं उत्तर योग्य आहार आणि विहार. वय वाढतं तसा आहार कमी होतो विहार मंदावतो आणि वात दोषाची विकृती वाढते. आवडणाऱ्या गोष्टींवर प्रतिबंध येतात. म्हणून मा‌नसिक वाताचासुद्धा क्षोभ होतो आणि आजारपण बळावते.

Health
Vastu Tips Health: घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात, या '6' उपायांनी करा आजार दूर

वात कोणत्या पदार्थ बळवतो?

1) शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या गोष्टी वात असणाऱ्यांनी खाऊ नये. कोरडेपणा, पोकळपणा वाढणारा आहार कमी करायला हवा. त्यामुळे वात विकोपाला जाऊ शकतो.

2) जर तुम्ही भाज्या खात असालत तर त्या ओल्या म्हणजे रसभाजी असलेल्या असायला हव्यात याचे कारण असे की, ज्या भाज्या कोरड्या असतात त्या भाज्यांमुळे तुमच्या शरीराला आवश्यक घटक मिळत नाही.

3) सुकलेल्या भाज्या जास्त काळासाठी खाणे हे देखील घातक असते ते टाळायला हवे.

4) सुके मासे हे खूप जणांच्या आवडीच्या भाग आहे. खारवलेले सुके मासे चवीला खूप चांगले लागले तरी देखील हा कोरडा आहार आणि मिठाचे अतिरिक्त प्रमाण यामुळे शरीराला वात होण्याची शक्यता जास्त असते.

5) शरीराची एक रचना आहे या रचनेनुसार आहार घेणे हे तुमच्यासाठी फार गरजेचे असते असे असताना जर तुम्ही दूध मासे, आंबट फळे- दूध अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करुन खात असाल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

6) खूप अति खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. पुरेशा प्रमाणात आहार घेतला नाही तरी देखील वात वाढू शकतो.

7) मूग, मसूर, तूर, वाटाणे, मटार, पावटे हे चवीला आणि आरोग्यासाठी कितीही पोषक असले तरी देखील ते वात असणाऱ्यांसाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे याचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे.

8) खूप जणांना अति उपवास आणि अनशन म्हणजेच जेवण न करण्याची सवय असते ही सवय ही आरोग्यास हानिकारक ठरु शकते. त्यामुळे जेवण हे व्यवस्थितच असायला हवे.

9) तुरट-तिखट- कडू अशा चवी आपल्याला कितीही आवडल्या तरी देखील वात असणाऱ्यांनी या गोष्टी टाळलेल्या बऱ्या असतात. कारण त्यामुळेही वात विकोपाला जातो.

10) शरीरात मॉईश्चर टिकून राहणे फार जास्त गरजेेचे असते. जर शरीरात मॉईश्चर टिकून ठेवायचे असेल तर तुम्ही बुळबुळीतपणा आणि ओलावा कमी करणारे पदार्थ टाळायला हवेत. त्यामुळे सांधे दुखी जास्त प्रमाणात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com