

Why Does Watermelon Cause Bloating After Meals? Doctors Reveal the Real Reason
sakal
Mumbai Food Poisoning Case: मुंबईतील भेंडी बाजार परिसरात नुकतीच घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली. एका कुटुंबातील चार जणांचा संशयित अन्नविषबाधेमुळे मृत्यू झाल्यानंतर कलिंगड खाण्याबाबत भीती आणि चर्चा दोन्ही वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर या कुटुंबानं कलिंगड खाल्लं आणि काही वेळातच त्यांना उलट्या, चक्कर आणि तब्येत बिघडण्याची लक्षणं दिसू लागली. या घटनेनंतर “जेवणानंतर कलिंगड खाणं खरंच धोकादायक ठरू शकतं का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक वेळी कलिंगड धोकादायक नसतं, पण चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्लं, तर ते पोट फुगणं, गॅस आणि पचनाच्या समस्या वाढवू शकतं.