'कृषी कायदे' रद्द झाल्यानंतर काय म्हणालेत बॉलीवूड सेलिब्रेटी?

बॉलीवूड सेलिब्रेटींनी शेतकरी बांधवांचे कौतूक केले आहे......
'कृषी कायदे' रद्द झाल्यानंतर काय म्हणालेत बॉलीवूड सेलिब्रेटी?

ज्या कायदयासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन छेडले होते. आजवर चाललेल्या सर्वाधिक काळच्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक अध्यादेश मागे घेतला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन देखील या गोष्टीचा निषेध करण्यात आला होता.रिचा चढ्ढानं म्हटलं आहे की, सरकारला शेतकऱ्यांकडून काही शिकण्याची गरज आहे. त्यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. तुम्ही जिंकला आहात, तुमच्या जिद्दीला सलाम... तुमचा विजय हा सगळ्यांचा विजय आहे.

तापसीनं आपल्या सोशल मीडियावर पीएम मोदी यांच्या वक्तव्याचा स्क्रिन शॉट शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे की, या लढ्यामध्ये यशस्वी झालेल्यांना मनपूर्वक शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com