- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
राष्ट्रपती कोविंद यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन! पाहा खास फोटो

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत पुष्पहार अर्पण करत छत्रपतींना अभिवादन केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे काल दुपारी साडेबारा वाजता पाचाड येथे आगमन झाले. त्यानंतर ते रोप-वेने रायगड किल्ल्यावर गेले. गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रायगडावर जय्यत तयारी सुरू होती.

दिल्लीपासून तालुका पोलिस ठाण्यापर्यंतची संरक्षण यंत्रणा गडावर कार्यरत होती.

रायगडावर होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरण्यास शिवभक्तांनी विरोध दर्शवल्यानंतर हेलिकॉप्टर पाचाड येथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाचाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले.

यावेळी रायगडावर ढोल वादकाचा आवाज ही सगळीकडे घुमत होता.

रायगड रोप-वे या ठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी राष्ट्रापतींचे स्वागत केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पत्नी सविता कोविंद आणि मुलीसह रायगडावर आले होते.

रायगडावर राष्ट्रपतींनी राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट दिली.

तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी भारताचे राष्ट्रपती रायगडावर आले आहेत. त्यामुळे गडावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नियोजित दौऱ्यानुसार राष्ट्रपती दीड वाजेपर्यंत रायगडावर थांबणार होते; मात्र त्यांच्या भोजनाची व्यवस्था गडावरच असल्याने चार वाजेपर्यंत ते गडावरच थांबले.

त्यानंतर आपल्या अभिभाषणात रामनाथ कोविंद यांनी गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते, असे सांगितले.

त्यानंतर आपल्या अभिभाषणात रामनाथ कोविंद यांनी गांधीजींनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते, असे सांगितले.

रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी विशेष बग्गीची व्यवस्था निमंत्रकांनी केली होती.

होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर या अंतरात या बग्गीचा वापर करण्यात आला.

रायगडावर आधारित माहितीपटाचेदेखील त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.



वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.