IND vs SA: पंतच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच जिंकला; विजयाचे 5 हिरो

सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले
Rishabh Pant ind vs sa First win as Team India
Rishabh Pant ind vs sa First win as Team India
Updated on

Rishabh Pant ind vs sa First win as Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. सलग दोन पराभव झालेल्या भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले आहे. भारतीय संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच जिंकला आहे. टीम इंडियाच्या या विजयात हे 5 खेळाडू हिरो बनून आहे.

ऋतुराज गायकवाड -  ईशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. गायकवाडने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले.
ऋतुराज गायकवाड - ईशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. गायकवाडने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले.
ईशान किशन - किशनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले. पहिल्या T20 सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. तिसऱ्या सामन्यात ईशानने 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
ईशान किशन - किशनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले. पहिल्या T20 सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते. तिसऱ्या सामन्यात ईशानने 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
हर्षल पटेल - हर्षल पटेलने मधल्या षटकांमध्ये लागोपाठ विकेट घेत आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडले. हर्षलने अवघ्या 25 धावांत चार बळी घेतले.
हर्षल पटेल - हर्षल पटेलने मधल्या षटकांमध्ये लागोपाठ विकेट घेत आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडले. हर्षलने अवघ्या 25 धावांत चार बळी घेतले.
युझवेंद्र चहल - गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात नसलेल्या युझवेंद्र चहलनेही या सामन्यात तीन विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. चहलने चार षटकांत २० धावा देत तीन बळी घेत फलंदाजांवर एकीकडून दडपण ठेवले.
युझवेंद्र चहल - गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात नसलेल्या युझवेंद्र चहलनेही या सामन्यात तीन विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. चहलने चार षटकांत २० धावा देत तीन बळी घेत फलंदाजांवर एकीकडून दडपण ठेवले.
हार्दिक पांड्या -  शेवटच्या षटकात तुफानी खेळी खेळत पंड्याने अवघ्या 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली. त्याची ही खेळी अखेरीस भारतासाठी महत्त्वाची ठरली.
हार्दिक पांड्या - शेवटच्या षटकात तुफानी खेळी खेळत पंड्याने अवघ्या 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली. त्याची ही खेळी अखेरीस भारतासाठी महत्त्वाची ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com