Jalgaon News : शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्याचे ‘महावितरण’चे आवाहन

 light bill
light bill sakal

जळगाव : शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने प्रयत्‍न सुरू केले आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते बदलण्याची प्रक्रियाही गतिमान करण्यात आली आहे. (Appeal of Mahavitaran to farmers to pay electricity bill jalgaon news)

याचबरोबर शेतकऱ्यांनीही कृषिपंपांचे वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महा‍वितरणने सूक्ष्म नियोजन केले आहे.‍

कृषिपंपांचे रोहित्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते लवकरात लवकर बदलून देत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही रोहित्र जळू नये वा नादुरुस्त होऊ नये, यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 light bill
Farmer Study Tour : कृषी तंत्रज्ञानाचा आविष्काराचा शेतकऱ्यांना अनुभव; आधुनिक शेतीबद्दल माहिती

जितक्या अश्वशक्तीसाठी वीजजोडणी मंजूर झाली आहे, तितक्याच अश्वशक्तीचा कृषिपंप शेतकऱ्यांनी वापरावा. तसेच अनधिकृत वीज वापरू नये, जेणेकरून आपले रोहित्र सुस्थितीत राहील व अतिभारामुळे ते जळणार नाही.

मार्चपर्यंत ३० टक्के सवलतीचा लाभ घ्या

दरम्यान, महावितरणतर्फे २०२१ पासून महाकृषी ऊर्जा अभियान राबविले जात आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आली होती. ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे ‘महावितरण’ने कळविले आहे.

 light bill
Sane Guruji Memorial : सानेगुरुजी स्मारकाच्या आवारात समाजकंटकांकडून आग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com