Planting
sakal
जळगाव - राज्यात अद्याप मॉन्सून दाखल झाला नसतानाही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण करण्याची घाई केली आहे. बागायतदार शेतकऱ्यांकडून कापसाचा पेरा करण्यात आला आहे. यासोबतच मॉन्सूनपूर्व पीक लागवडीलादेखील सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मका व उडीद व मुग यांसारख्या पिकांची पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मॉन्सूनचा नियमित पाऊस वेळेत न झाल्यास उगवण झालेल्या पिकांवर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.