
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी टाळावी, यासाठी दीड वर्षापासून शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. कंत्राटदाराला मार्च २०२१ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यास वेळ आहे. मात्र अद्याप महामार्ग चौपदरीकरणाचे केवळ साठ टक्के काम झाले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदारांची बैठका घेऊनही शहरातील चौपदरीकरणाच्या कामास अद्यापही हवा तसा वेग आलेला नाही.
आवश्य वाचा- सतत येणाऱ्या शिंका पासून त्रस्त आहातं; हे घरगुती उपचार अवलंबा आणि आराम मिळवा -
शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग ठरला आहे. वर्षभरात तीनशेच्यावर अपघात होऊन त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. असे असताना शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम अद्यापही थंड बस्त्यात आहे. प्रभात कॉलनीजवळ तयार केलेल्या पुलाचे काम, शिवकॉलनीजवळील रेल्वे बोगद्यावरील काम, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडीजवळील उड्डाणपुलाचे काम अद्यापही संथ गतीने सुरू आहे. सर्वच ठिकाणी कामगार कमी असल्याने कामास वेग येत नाही.
अपघाताचा धोका कायम
कंत्राटदाराने मुख्य मार्गाचे काम करताना पर्यायी रस्त्यावर योग्य त्या सुविधा देण्याची जबाबदारी आहे. अपघाती जागावर पथदर्शक फलक लावणे गरजेचे आहे. रस्ता अनेक ठिकाणी खराब आहे. अनेक ठिकाणी खडी, वाळू पसरली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. अनेक ठिकाणी धूळ उडते. यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अडचणी येतात. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.