Amrut Yojana : तब्बल 45 कॉलन्यांत या तारखेपासून ‘अमृत’चे पाणी; नवी जोडणीचे आवाहन

water supply
water supplyesakal

Jalgaon News : शहरातील बहिणाबाई चौधरी जलकुंभावरून बजरंग कॉलनी, दशरथ कॉलनी आदी ४५ कॉलनींमध्ये ‘अमृत’ योजनेचे शुक्रवार (ता. ५)पासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या भागातील जुनी योजना बंद करण्यात येणार आहे. (in 45 colonies water by Amrit yojana from 5 may jalgaon news)

महापालिकेतर्फे शहरातील अनेक भागांत अमृत योजनेची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत आता बहिणाबाई चौधरी जलकुंभावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फे झोन क्रमांक ११ अंतर्गत बजरंग कॉलनी, दशरथनगर, श्रीराम कॉलनी, के. बी. नगर, तळेले कॉलनी, शंकररावनगर, गिताईनगर, कावेरी हॉटेल, प्रेमचंदनगर आदी तब्बल ४५ कॉलनींमध्ये शुक्रवारपासून अमृत योजनेच्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

water supply
Political News : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

या भागातील जुन्या जलवाहिनीवरून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. खेडी भागात १२ मेपासून अमृत योजनेवरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नवीन अमृतची जोडणी करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांनी केले आहे.

water supply
Jalgaon GMC : जीएमसीत नवजात बालकांची अदलाबदल; अन्‌ उडाला गोंधळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com