Jalgaon flyover collapse contractor FIR
esakal
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद वळणरस्त्यावरील (बायपास) असोदाजवळील उड्डाणपुलाचा भाग खचल्यापासून आजअखेर एकूण सात निष्पाप लोकांचा बळी गेला (Jalgaon flyover collapse contractor FIR) आहे. अखेरीस नागरिकांसह पोलिस दलाचा संयम तुटल्याने पोलिस दलाने संवेदनशीलतेचा परिचय देत स्वतःहून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुलाच्या कामादरम्यान व दुरुस्ती करतानाही केवळ खर्च वाचविण्याच्या दृष्टीने लोकांचा जीव धोक्यात आणल्याचा ठपका या गुन्ह्याच्या कारणांमधून ठेवण्यात आला आहे.