

Jalgaon Farmer Crisis
esakal
जळगाव: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नसल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. गेल्या २०२५ या वर्षांत तब्बल २०३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यंदा आठ महिन्यांत आतापर्यंत ९९ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा व अन्य कारणांमुळे मृत्यूला जवळ केले.