Jalgaon Crop Insurance : खानदेशातून एक लाख 70 हजार पीकविमा अर्ज दाखल

Crop Insurance : राज्यात विविध खरीप पिकांचा विमा अर्ज भरण्याची मोहीम सध्या सुरू असून, १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
Crop Insurance
Crop Insurance esakal
Updated on

Jalgaon Crop Insurance : राज्यात विविध खरीप पिकांचा विमा अर्ज भरण्याची मोहीम सध्या सुरू असून, १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २ जुलैपर्यंत खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांतून एक लाख ६९ हजार ६३४ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातून कर्जदार आणि बिगर कर्जदार सभासद शेतकरी आपल्या शेतातील खरीप हंगामातील पिकांचा विमा या योजनेंतर्गत काढत असून, रोज त्यात सुमारे पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग दिसून येत आहे. (One lakh 70 thousand crop insurance application filled form in Khandesh )

२ जुलैपर्यंत राज्यात ५१ लाख ४४ हजार ६०२ शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. दरम्यान, राज्यात विमा उतरविण्यासाठी विविध संस्था व सीएससी सेंटरमार्फत शेतकरी विमा अर्ज दाखल करीत असून, रोज त्यात वाढ होत आहे. या अर्जातून राज्यभरातील ३८ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला आहे. (latest marathi news)

Crop Insurance
Jalgaon Crop Insurance : कापूस, केळी पीक विम्याची रक्कम द्या

जळगाव जिल्ह्यात ९२,५०२ शेतकऱ्यांनी ८८,६३२ हेक्टर क्षेत्राचा, धुळे जिल्ह्यात ६२,८९६ शेतकऱ्यांनी ६०,582५८२ हेक्टर क्षेत्राचा, तर नंदुरबार जिल्ह्यातील १४,२३६ शेतकऱ्यांनी १६,२७९ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. शासनामार्फत एक रुपयांत विमा उतरविला जाण्याची योजना असली, तरी त्यासाठी सीएससी केंद्रावर बराच खर्च होत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून वाढत आहेत.

Crop Insurance
Jalgaon Crop Insurance : निकष बदलाचा निर्णय ठरतोय केळी उत्पादकांसाठी लाभदायी! हवामानावर आधारित फळ पीकविमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.