

Jalgaon Water Storage
esakal
जळगाव: जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, गिरणा या सिंचन प्रकल्पांत चांगला जलसाठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असली तरी, सिंचन प्रकल्प भरलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. मात्र, आतापासूनच महापालिकेसह पालिका, नगरपरिषदांनी पाण्याचे योग्य वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.