चाळीसगाव तालुक्यात गहू, ज्वारीसह पिके आडवी 

farmer
farmer

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात होत असलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागा व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी (ता. २३) मेहुणबारे आणि बहाळ या दोन्ही मंडळांतच तब्बल एक हजार ८०० हेक्टरवर पिकांना वादळ आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. या वादळात व पावसात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 
तालुक्यात अनेक ठिकाणी शेतातील फळबाग व उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात प्रामुख्याने कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, मका, आंबा व लिंबू फळबाग व इतर पिकांचा समावेश आहे. 

महसूल विभागाकडून पाहणी 
तहसीलदार अमोल मोरे व कृषी विभागाचे पथक बहाळ, टेकवाडे भागात पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करीत आहे. मेहुणबारे आणि बहाळ या दोन मंडळांतच मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने सुमारे एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू, मका, आंबा, लिंबू, ज्वारी, बाजरी या पिकांचे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस व वादळाने अक्षरश: धुमाकूळ घातला. बहाळ परिसर कैरीचे आगर मानले जाते. मात्र, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेवगा लिंबू, आंबा व अन्य फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. ज्वारी, बाजरी, मक्यालाही फटका बसला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com