गिरणा’ची शंभरीकडे वाटचाल; नदीकाठावरील गावांनी सतर्कतेचा इशारा !

गिरणा’ची शंभरीकडे वाटचाल; नदीकाठावरील गावांनी सतर्कतेचा इशारा !
Updated on

भडगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा आणि शेत भिजविणारे गिरणा धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. आज धरण ९४ टक्के भरले असून, आगामी चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रातील व धरण परिसरात होत असलेल्या पावसाचा अंदाज घेऊन गिरणा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. 

परिसरात पाऊस किती झाला यापेक्षा गिरणा धरणात किती जलसाठा वाढला, याकडे निम्म्या जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असते. एक जूनला गिरणा धरणात ३१ टक्के जिवंत जलसाठा होता. तीन महिन्यांत धरणात ६३ टक्के जलसाठा वाढला असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ‘गिरणा’पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र आहे. 

‘गिरणा’त ६३ टक्के वाढ 
निम्म्या जळगाव जिल्ह्याचे शेती व पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या गिरणा धरणात यंदा आतापर्यंत ६३ टक्के एवढ्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाळ्यापूर्वी धरणात ३१ टक्के जलसाठा होता. मात्र, आता धरणात आज ९४ टक्के एवढा जिवंत जलसाठा आहे. म्हणजे १७,४३६ दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त जलसाठा आहे, तर तीन हजार दशलक्ष घनफूट एवढा मृतसाठा धरून धरणात २०,४३६ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. 

२०३७ क्युसेसने आवक 
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी तीन धरणे शंभर टक्के भरली, तर दोन धरणांतही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. त्यामुळे त्या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत, तर ‘चणकापूर’मध्ये ९५ टक्के, तर ‘पुनद’मध्ये ९५ टक्के जलसाठा आहे. अजून निम्मा पावसाळा बाकी आहे. त्यामुळे धरणात आवक वाढण्याची चिन्हे आहेत. २०३७ क्युसेसने धरणात आवक सुरू असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे एस. आर. पाटील यांनी सांगितले. मन्याड धरणातून ‘गिरणा’पात्रात पाणी येत असल्याने नदी वाहत आहे, तर लाभक्षेत्रातही या आठवड्यात पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. 

धरणातून पाणी सुटणार 
‘गिरणा’च्या पाणलोट क्षेत्रातील धरण परिसरात होत असलेला पाऊस, धरण परिसरात बरसत असलेला पाऊस पाहता, धरणातून पुढील २४ तासांत आवश्यकतेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे. धरणात येत असलेले पूरपाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. त्या आशयाच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. 

पाणलोट क्षेत्रातील धरणाची स्थिती व सुरू असलेला विसर्ग 
धरण..........................विसर्ग 
चणकापूर.................६६१ 
पुनद.........................५०० 
केळझर......................३० 
हरणबारी ..................८४६ 
नाग्यासाक्या..................०० 

गिरणा धरण दृष्टिक्षेपात 
धरणाची क्षमता...२१५०० दशलक्ष घनफुट 
धरणाचा मृतसाठा..३००० दशलक्ष घनफुट 
उपयुक्त जलसाठा...१८५०० दशलक्ष घनफुट 
सद्यःस्थितीत उपयुक्त जलसाठा.. दशलक्ष घनफूट....१७४३६ 
एकूण लाभक्षेत्र... ६९,००० हेक्टर 
जळगाव जिल्ह्यातील एकूण लाभक्षेत्र....५७२०९ हेक्टर 
जलसिंचनाचे फायदे मिळणाऱ्या तालुक्याची संख्या...०८ 
धरणावर अवलंबून पाणीपुरवठा योजना...१५८ ग्रामीण व चार पालिकेच्या योजना 

गिरणा धरणात आज ९४ टक्के साठा आहे. धरणात आज २०३७ क्युसेसने आवक सुरू आहे. लवकरच धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी. 
- धर्मेद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे, जळगाव 

पाणलोट क्षेत्रातील धरण परिसरात होत असलेल्या पावसाची परिस्थिती पाहून पुढील २४ तासांत धरणातून पूर-पाणी सोडण्यात येणार आहे. नदीकाठावरील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी. 
- हेमंत पाटील, उपविभागीय अधिकारी, गिरणा पाटबंधारे, चाळीसगाव 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com