साहेब..तुमचा पाया पडतो, तास दोन तास तरी वीज द्या !

साहेब..तुमचा पाया पडतो, तास दोन तास तरी वीज द्या !

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): अवकाळी पावसाचे संकट दुसरीकडे विज कंपनीचा विज कनेक्शन कट करण्याचा सपाटा यातच हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या शक्यतेने बळीराजा हा सैरभैर झाला आहे. अवकाळीच्या तडाख्यातून सुटका होत नाही तोच विज कंपनीने हा दिलेला शाँक यातच बळीराजा पिळला जात आहे. शेतीपंपाचा  वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतीलाच काय तर जनावरांना देखील घोटभर पाणी मिळण्याची मारमार सुरु झाली आहे. साहेब तुमचा पाया पडतो, तास दोन तास तरी गुरा ढोरांसाठी वीज द्या अशी याचना शेतकरी वीज कंपनीच्या साहेबांपुढे केली.   वरखेडे शिवारात तब्बल 35 डिपींवरील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसह जळगावी विज कंपनीच्या कार्यालयातील आंदोलनानंतर शेतीपंपाचा विज पुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला आहे.दोन दिवसानंतर पुन्हा वीज कनेक्शन कट करण्याचे संकेत देखील वीज कंपनीकडून मिळाले आहेत.


चाळीसगाव शेतीपंपाची मोठ्या प्रमाणावर वीज थकबाकी असल्याचे सांगत 50 टक्के वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई विज वितरण कंपनीकडून सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीपंपाचा विज पुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडीत होत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.या असंतोषातूनच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना घेत थेट जळगाव गाठून विज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला खूर्चीसकट दोराने बांधल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. मात्र या घटनेनंतरही चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची फरफट थांबायला तयार नाही.


गेल्या तीन चार दिवसापासून मेहूणबारे, वरखेडे व तिरपोळे गावातील 29 डिपींवरील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. गतवर्षी तालु्नयात बोगस खते उघडकीस आली. यावर्षी बोगय बियाणेमुळे शेकडो शेतकऱ्यांना फटका बसला. तर काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढले. यातून कसेबसे वाचलेल्या शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी धडपड सुरू असतांनाच थकीत विज बिलाचे कारण सांगून महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार सुरू आहे.वरखेडे येथे तीन दिवसात पाच डिपींवरील शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. आज शनिवारी आणखी 30 डिपींवरील विज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे अंधार पसरला आहे.आता वाचलेल्या पिकांना पाणी कसे द्यायचे याची चिंता लागली आहे.

मुक्या जनावरांचे हाल


वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाण्याअभावी पिके धोक्यात आली असतांनाच मुक्या जनावरांवरही संकट कोसळले आहे.शेतीशिवारात पाणी मुबलक आहे पण वीज पुरवठा नसल्याने जनावरांची तहान कशी भागणार  याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.काही शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून  मु्नया जनावरांची तहान भागविण्यासाठी तास दोन तास वीज पुरवठा सुरू करावी अशी याचना केली पण साहेबांना काही पाझर फुटला नाही.


पुन्हा कट होणार 

वीज कंपनीने आज शनिवारी दुपारी चारला मेहूणबारे, वरखेडे, तिरपोळे भागातील ज्या 59 डिपींवरील विज पुरवठा खंडीत केला होता तो एक दिवसापुरता पुन्हा सुरू केला आहे. मात्र रविवार पासून पुन्हा वीज कट करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याचे संकेत विज कंपनीने दिले आहेत.जे शेतकरी वीज बिल भरतील त्याच शेतकऱ्यांच्या डिपीवरील वीज पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे संकेतही विज कंपनीकडून मिळालेले आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com