
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा दिवसभरातील अहवाल प्राप्त झाला. यात जिल्ह्यात ४३ नवीन बाधित रूग्ण आढळून आले, तर ४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली.
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाणात स्थिरावले आहे. आठवडाभरापासून बाधितांची संख्या पन्नासच्या खाली आढळून येत असून, आज बरे झालेले आणि नवीन बाधितांची संख्या बरोबरीत राहिली. यात केवळ सहा रूग्णांची तफावत राहिली. मात्र कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला.
जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा दिवसभरातील अहवाल प्राप्त झाला. यात जिल्ह्यात ४३ नवीन बाधित रूग्ण आढळून आले, तर ४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली. यामध्ये आठ तालुक्यांमध्ये एक देखील रूग्ण आढळून आला नाही हे विशेष. आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ५९१ रूग्ण बाधित झाले आहेत. त्यापैकी ४०५ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे; तर ५३ हजार २३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
भुसावळमध्ये दोघांचा मृत्यू
कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आज देखील कायम राहिली आहे. कोरोनामुळे आज दिवसभरात दोन रूग्णांचा मृत्यू झाला. हे दोघेही रूग्ण भुसावळ तालुक्यातील आहेत. आजच्या मृत्यूंमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ हजार ३०९ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
असे आढळले रूग्ण
जळगाव शहर २०, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ७, अमळनेर ३, यावल-१, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१ असे एकुण ४३ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर चोपडा, भडगाव, धरणगाव, पाचोरा, एरंडोल, जामनेर, रावेर, बोदवड तालुक्यात एक देखील रूग्ण आढळून आला नाही.