आघाडी सरकारचे विर्सजन व्हावे हे जनतेच्या मनातील इच्छा-गिरीश महाजन

Political News : भारतीय जनता पार्टी देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातखाली विरोधीपक्षाची चोख पणे भुमीका बजावीत आहे.
 Girish Mahajan
Girish Mahajan

जळगावः राज्यात जनता, शेतकरी, विद्यार्थी अनेक प्रश्नांनी त्रस्त असून आमच्या मनात नसून हे आता जनतेच्या मनातच आहे की महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) विर्सजन व्हावे, असे मत भाजपचे नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

 Girish Mahajan
चाळीसगाव :पोहायला गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

जळगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजनांशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, की आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून सध्याच्या घडामोडीवर बघत आहोत. भारतीय जनता पार्टी देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातखाली विरोधीपक्षाची चोख पणे भुमीका बजावीत आहे. कोण काय म्हणते, कोण गंमतीच म्हणतात याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असे खोचक टोला यावेळी त्यांनी आघाडीतल नेत्यांना लागविला.

 Girish Mahajan
राज्यातील अनेक माध्यमिक शाळांच्या संचमान्यतेला लागला ब्रेक..!

जनता त्रस्त..

राज्यातील सर्व जनता त्रस्त असून प्रत्येक जणांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई, विज बिल, विद्यार्थ्यांचे परिक्षा, तसेच सर्व सामान्य जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त असून या आघाडी सरकारला जनतेची काही घेणे देणे नाही. त्यामुळे जनतेच्या मनातच आता ही आघाडी सरकारचे केव्हा विर्सजन होईल असे वाटत आहे असे म्हणून आघाडी सरकारविरुध्द टिका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com