राज्य शासनाने चुका केल्या, आणि त्यामुळेच राज्यात कोरोना पून्हा वाढला !

girishe mahajan
girishe mahajan
Updated on

जळगाव ः राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून याला कारणीभूत राज्यशासनच आहे. त्यांनी केलेल्या चुकांमूळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्याची गरज होती परंतू केली नाही. आणि त्यात राज्यशासनातील नेते, पूढारी यांनी काढलेल्या यात्रा, मोर्चांमुळे राज्यात  कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शासनावर टिका केली. 

जळगाव येथे आज शिवजयंती निमित्त गिरीश महाजन आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना म्हणाले, की कोरोनाचे कारण दाखवित शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्यशासनाने बंधन घातले परंतू मात्र दुसरीकडे त्यांचे नेते, पुढारी मोठी गर्दी जमवीत राज्यात यात्रा, मोर्चे काढत आहे. तसेच मोटर सायकल रॅली, विमान तळावर गर्दी करत आहे. त्यामुळे शिवजयंती साजरी करण्यास कोरोनाचे नियम दाखवितात आणि दुसरीकडे त्यांचेच नेते नियमांची पायमल्ली करतात हा कोणता न्याय आहे. सर्वांना सारखे नियम राज्यशासनाने लाण्याची गरज आहे, असे महाजन म्हणाले. 

अजून निर्बंध घालण्याची गरज
कोरोनाचा संसर्ग राज्यशासनाच्या अनेक चुकांमूळे राज्यात पून्हा वाढलेला आहे. अनेक गोष्टींवर निर्बंध कडक राबविण्याची गरज असतांना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि कोरोनाचे रुग्ण राज्यात पून्हा वाढले.अजून ही वेळ गेली नसून शासनाने कडक निमयांची अमलबंजावणी सुरू करावी असे महाजन म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com