Jalgaon Temperature
sakal
जळगाव - वाढत्या उष्णतेने केवळ तापमानच वाढले नाही, तर जळगावकरांचा दिनक्रमही बदलला आहे. एप्रिलमध्येच ४४ अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारचा वेळ टाळत आपली कामे सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वाढलेल्या तापमानामुळे डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचेही सध्या शहरात पाहण्यास मिळत आहे.