जळगाव : कापूस व्यापारी राजेंद्र पाटील व इतर पाच व्यापाऱ्यांनी वाडी शेवाळे (ता. पाचोरा) येथील ४६ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला. मात्र त्याचे पैसे न देताच संशयित व्यापारी फरार झाल्याने शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसाठी उपोषण सुरू केले आहे. पाचोरा जागृत जनमंच व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की वाडी शेवाळे येथे कापसाचे व्यापारी राजेंद्र पाटील व इतर पाच जणांनी मिळवून गावातील कापूस शेतकऱ्यांचा माल दरवर्षीप्रमाणे घेऊन यावर्षी मात्र अद्यापपावेतो व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कापसाचे पैसे अदा केले नाही. सदरील कापूस त्यांनी या हंगामात घेतला असून जवळपास सर्वच शेतकऱ्यांना दरवर्षांप्रमाणे संक्रांतीला पैसे देतो म्हणून सांगितले होते. मात्र संक्रांतीला पैसे मागण्यास गेले असता त्यांना ४-८ दिवसाची वेळ मारून नेली. ११ फेब्रुवारी संध्याकाळपासून सदरील व्यापारी, पत्नी, मुलांसह गाव सोडून गेला. उपोषणात पाचोरा जागृत जनमंचचे उपाध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, शेतकरी गणेश निंबा पाटील, इंद्रसिंग पाटील, प्रभाकर पाटील, सुरेश पाटील, सुरेश शिंपी, विनोद धोबी, परमेश्वर गायकवाड, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील, कृष्णराव पाटील आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.