उकिरड्याचे पालटले रूपडे

औरंगाबाद - उकिरड्याच्या जागेवर बहरलेले हेच ते शतपावली उद्यान.
औरंगाबाद - उकिरड्याच्या जागेवर बहरलेले हेच ते शतपावली उद्यान.

औरंगाबाद - शहरात कचराप्रश्‍नाने अर्धशतकी गाठल्याने एकीकडे कचराबाद म्हणून हिनविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे एकेकाळी उकिरडा असलेल्या ठिकाणी शतपावली उद्यानाने देवानगरी परिसराचे रूपडेच पालटले आहे. आर्य वैश्‍य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

देवानगरीतील शहानूरमियाँ दर्गा रेल्वे क्रॉसिंगलगत पूर्वी कचऱ्याचे ढीग साचले जात होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. सकाळचे चालणे आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास जाणवत होता. याची दखल घेत रेल्वेच्या सुरक्षा भिंतीलगत सुमारे एक किलोमीटर लांब आणि ३० फूट रुंद जागेवर वैश्‍य समाजाच्या माता कन्यका परमेश्‍वरी यांच्या जयंतीदिनी ५ मे २०१६ मध्ये कामाला सुरवात केली. अवघ्या दोन वर्षांत संस्थेने नगरसेविका शोभाताई बुरांडे, प्रदीप बुरांडे यांच्या साथीने शतपावली उद्यान साकारले आहे. 

कडक उन्हाळ्यातही संस्थेने पाण्याचे नियोजन केल्याने उद्यान अधिकच बहरत आहे. शतपावली उद्यानासाठी शोभाताई बुरांडे, प्रदीप बुरांडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी ब्रह्मानंद चक्‍करवार, आशिष कोडगिरे, सुशील बंडेवार, ज्ञानेश्‍वर तगडपल्लेवार, राजेश चालिकवार, नितीन गुंडेवार, सुहास वट्टमवार, बालाजी कोत्तावार, आशिष लाभशेटवार, शिवकुमार दरबारवार, लक्ष्मीकांत उमरीकर, राजेश पत्तेवार यांनी विशेष योगदान दिले. उद्यान साकारण्यासाठी श्री. संचेती यांनीही मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com