नवीन संचमान्यता धोरणाविरोधात शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या धोरणानुसार समाजशास्त्र पदवीधर उमेदवार हद्दपार होणार आहेत.
रत्नागिरी : संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार (New Policy) शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार होत आहे. त्यामुळे हजारो शिक्षक (Teacher) अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे शिवाय नवीन संचमान्यतेमुळे जिल्ह्यातील १ हजार ३०५ शाळा (School) बंद होण्याचा धोका संभावत आहे.