रत्नागिरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ८,०९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ कोटी ७४ लाख ८२ हजार रक्कम जमा झाली आहे. ११ हजार ८३८ खातेदारांपैकी ८०९९ खातेदारांची कर्जमुक्ती झाली असून उर्वरित खातेदारांची खाती प्रमाणित झाल्यानंतरच त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाआघाडी सरकार आल्यानंतर काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. पहिल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १८,६२८ शेतकरी निकषानुसार पात्र ठरलेले होते. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ११ हजार ८३८ खातेदारांनी बॅंकांकडे नोंदणी केली होती.
पावणेचार हजार खातेदार शिल्लक
त्यानंतर कर्ज खात्यांची छाननी करून बॅंकांनी ९,५११ कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरण करून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या. त्यापैकी ८६४३ खाती प्रमाणित केली, तर ८६८ खाती शिल्लक राहिली होती. प्रमाणित केलेल्या कर्जखात्यांपैकी ८,०९९ कर्जखात्यांवर २२ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच शासनाकडून शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
कर्जमाफी शेतकऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका शेतकरी कर्जमाफी रक्कम
मंडणगड 404 दोन कोटी 13 लाख 60 हजार 263
दापोली 402 60 लाख 39 हजार 897
खेड 852 दोन कोटी 11 लाख 69 हजार 675
चिपळून 1277 1 कोटी 79 लाख 28 हजार 842
गुहागर 646 1 कोटी 3 लाख 44 हजार 420
संगमेश्वर 1001 दोन कोटी 40 लाख 38 हजार987
रत्नागिरी 1035 दोन कोटी 82 लाख 86 हजार 558
लांजा 1238 चार कोटी 28 लाख 77 हजार 128
राजापूर 1244 पाच कोटी 54 लाख 44 हजार 230
संपादन - अर्चना बनगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.