"रत्नागिरीत झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीच्या कौशल्यवर्धक केंद्राप्रमाणे अनेक केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. यातून मुलांना फक्त प्रमाणपत्र मिळणार नाही, तर कुशल मनुष्यबळामुळे रोजगाराची दारे उघडली जातील."
रत्नागिरी : ‘राज्यात पुढील पाच वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्रात ४० लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून ५० लाख रोजगारनिर्मिती होईल. त्यासाठी स्किल (कौशल्य) असलेल्या कुशल कामगारांची गरज आहे. रत्नागिरीत झालेल्या टाटा टेक्नॉलॉजीच्या कौशल्यवर्धक केंद्राप्रमाणे अनेक केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे. यातून मुलांना फक्त प्रमाणपत्र मिळणार नाही, तर कुशल मनुष्यबळामुळे रोजगाराची दारे उघडली जातील,’ असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.